निकुंभ हाइटस च्या मागीलबाजूस प्रचंड कचरा,.. शहरात आठवडे बाजार सह सर्वत्र स्वच्छता गृह बंद! तिजोरी असल्या सारखे कुलूप लावले जाते!
मुख्याधिकारी व संबंधित या कडे लक्ष देणार का? अमळनेर परिषद 'माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानात' विभाग व राज्यात गुणवत्ता मिळविणारी ठरली, आम्ही देखील कौतुक केले पण नागरिकांनी फोटो सह तक्रारी केल्याने गुणवत्ता देणाऱ्या पथकाला हे दिसले नाही की दाखविले गेले नाही? की पाहुणचार घेऊन गुणवत्ता प्रमाणपत्र दिले की काय?
लोक तर म्हणतात की इतकी घाण असल्यावर देखील वसुंधरा व स्वच्छ अभियानात ज्यांनी अमळनेरची निवड केली त्यांना धरून हाणले पाहिजे!
मुख्याधिकारी उत्तर देतील का?
असा प्रश्न निकुंभ हाईट्स चे व्य
व्यापारी व शहरातील जागृत नागरिक विचारत आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments