पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाच्या निषेधार्थ कँडल मार्च!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे झालेले बळी ह्रदयद्रावक असून या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरी व तमाम देशप्रेमी नागरिकांच्या वतीने कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला 
या कॅण्डल मार्चमध्ये शहरातील सर्वधर्मीय नागरिक, युवक-युवती, विविध सामाजिक संघटना, मान्यवर नागरिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कॅण्डल मार्चची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. निघालेल्या या शांततेच्या आणि एकतेच्या मशालीने शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत परमपूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याजवळ कॅण्डल रॅली पोहचली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि
साने गुरुजी पुतळ्याजवळ देशभक्तीपर घोषणा, देशप्रेम जागवणारी गीते सादर करण्यात आली. रॅली दरम्यान "पाकिस्तान मुर्दाबाद", "आतंकवाद मुर्दाबाद", अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.नागरिकांच्या एकमुखी घोषणांनी परिसर दणाणुन गेला आणि सर्वत्र देशभक्तिचे वातावरण निर्माण झाले.समारोप प्रसंगी साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या गीताने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संदीप घोरपडे सर यांनी केले तर उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मौलाना रियाज़ शेख यांनी मानले.
अमळनेर शहराने दाखवलेल्या या एकतेच्या आणि शांततेच्या संदेशाने दहशतवादाचा निषेध करत बळी गेलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली. शहरातील सर्व जाती धर्मातील महिला पुरुष, विद्यार्थी, मोठ्या संख्येने हातात जळत्या मेणबत्त्या घेऊन संध्याकाळी 7.30,च्या सुमारास निघालेत तेव्हा शहरातील नागरिकांच्या कुतूहलाचा विषय झाला. या कॅण्डल मार्च ने एकता, शांतता आणि दहशतवादाविरोधातील ठाम भुमिका दाखवली. नागरिकांनी कॅण्डल मार्चला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वी झाला, साने गुरुजी पुतळ्याजवळ समारोप झाला. या कॅण्डल मार्चमध्ये राजु महाले, प्रा.अशोक पवार, बंसीलाल भागवत, गौतम मोरे, प्रा.विनय जोशी, शीला पाटील, तीलोतमा पाटील, सुलोचना वाघ, वसुंधरा लांडगे, बी के सुर्यवंशी, मनोज पाटील, एस सी तेले, राजु फाफोरेकर, मनोज मोरे, प्रवीन जैन, प्रा.श्याम पवार, प्रा.लीलाधर पाटील, रणजीत शिंदे, मनोहर नाना, संजय पाटील, भैय्या साहेब, ऍड शकील काजी, राजु शेख, अखलाक भाई, जहुर मुतवल्ली,निगराह फयाज भाई, क़मर अली शाह,हाजी दबीर पठान, हाजी सुपडु खाटीक,अ.खालीक, शराफ़त मिस्री, सैय्यद फारूक अली, दानिश,  इमरान भाया, शाहरुख सिंगर, अल्तमश शेख, रुकनोद्दीन अहलेकार,गयास अहलेकार, अहतेशाम भाई, जलाल, फारुख खाटीक, हाजी मुजफ्फर सेठ, कुदरत अली, अहमद अली, हाजी मकसूद पहेलवान,अ.गफ्फार खाटीक, कालु सर,नीसार खाटीक, जावेद सारबेटे, फारुख शेख उस्मान, जाकिर मिस्री, ऐजाज मिस्री, दिलावर काजी, अकरम पठान, उमेश धनराळे, जीतु ठाकुर, मून्ना शेख, हितेश बडगूजर, डि. ए.पाटील, महेंद्र पाटील, बापूराव ठाकरे, यांच्यासह हिंदू -मुस्लिम, दाउदी बोहरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. सर्वानी एकत्रितपणे मेणबत्त्या पेटवुन आणि सामुहिक श्रध्दांजली अर्पण करून मृतात्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments