अमळनेरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी आ.अनिल पाटलांचे निधीतून नेत्रम!

पोलिसांना मिळाले तिसऱ्या डोळ्याचे अत्याधुनिक अस्त्र!
अमळनेर शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी अमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार आहेत.  त्यासाठी आ. अनिल पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. 
काल अमळनेर शहरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या एकत्रित नियंत्रण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.
आमदार अनिल पाटील यांचे  आमदार निधी आणि डीपीडीसीच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तथा तिसरा डोळा देउन त्याचे नियंत्रण पोलिसांकडे दिल्याने त्याचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आ. पाटील हे प्रकृतीचे कारणे याप्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु माजी जीप सदस्या जयश्री अनिल पाटील यावेळी उपस्थित होत्या.  या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, डीवायएसपी विनायक कोते, डीवायएसपी केदार बारबोले उपस्थित होते. 
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून नेत्रम ही संकल्पना राबवण्यात आली असून अमळनेर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता पोलीस स्टेशन मधून होणार आहे. 
यावेळी पोलीस अधीक्षक रेड्डी म्हणाले की आमदार अनिल पाटील यांचा आमदार निधी आणि लोकसहभागातून बसवलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व संपूर्ण यंत्रणेची  देखभाल दुरुस्ती आता पोलीस करणार आहेत. नेत्रम यंत्रणा आणि ई बिट ऍप माध्यमातून पोलीस प्रशासन गतिमान झाले आहे. 
प्रास्ताविक करताना डीवायएसपी विनायक कोते म्हणाले की शहरातील विविध चौक आणि रस्ते ११० कॅमेऱ्यानी जोडले गेले आहे. इतरही भागातील कॅमेरे नेत्रम यंत्रणेशी जोडून शहर व तालुका अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रयत्नांतून ही यंत्रणा पूर्णपणे उभारली गेली आहे. यावेळी जयश्री पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या विकास निधीतून यंत्रणा उभारल्याचे सांगत आज स्थितीला शहराच्या व तालुक्याच्या विकासात भर पडत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले.
नेत्रम च्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांनी दिलेला अत्याधुनिक  तिसरा डोळा अमळनेर पोलिसांसाठी अस्त्रच ठरणार आहे. या माध्यमातून बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मार्केट किंवा बाजारपेठ व महत्त्वाचे परिसरात चोऱ्या, घातपात, गुन्हेगारी घटनांना अंकुश बसणार असून समाज कंटकाकडून होणारे कृत्य, चेन स्नेशिंग किंवा अपहरण अश्या अप्रिय घटनांवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे. आमदारांनी दूरदृष्टी ठेऊन हा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेचा सार्वभौम विचार करताना ते दिसत असून युवा वर्ग तथा क्रीडा क्षेत्र साठी क्रीडा संकुल डेव्हलपमेंट, बालक व  अबाल वृद्धांसाठी ओपन प्लेस डेव्हलपमेंट, आरोग्य सेवेसाठी ग्रामिण रुग्णालयाचे वृद्धीकरण,  प्रवाश्यांसाठी बस स्टँड चा विकास अशी अनेक पब्लिक इंटरेस्टची कामे त्यांच्या माध्यमातून होत आहेत.
●शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबविणार●
मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आणि  महिला दक्षता समितीच्या मदतीने शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून त्याबाबत शाळांना पत्रव्यवहार झाल्याचे पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले.
कार्यक्रमास खा. स्मिताताई वाघ यांचे सह महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ, माधुरी पाटील, प्रा शीला पाटील, प्रमोदिनी पाटील, अलका गोसावी, भारती शिंदे, डॉ राजेंद्र पिंगळे, मुख्तार खाटीक, महेंद्र बोरसे, जिजाबराव पाटील, योगेश महाजन, राकेश पाटील, सुरेश पाटील, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, आरिफ तेली आदी हजर होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments