भडगाव तालुक्यातील वटवाघळे पकडणाऱ्या टोळीस जेरबंद करा!

वन विभागाने तात्काळ दक्षता घ्यावी।

बांबरुड प्र. ब. पोस्ट गोंडगाव ता. भडगांव जिल्हा जळगांव येथे काही शिकारी वटवाघूळ पकडण्यासाठी दिवसाआड येतात, जाळे टाकतात.. त्या मुळे अन्य पक्षी देखील जाळ्यात अडकतात व पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होते.
वन विभागाचे गंभीर दुर्लक्ष होत आहे,

वटवाघूळ शिकार केवळ अंधश्रद्धेतून होत आहे, वटवाघूळाचे नखं, दात व खोपडी अघोरी कामा साठी, धन शोध, पुत्रप्राप्ती, दुश्मन संपविणे, राजकीय वा अन्य यश प्राप्त करणे आदी कामासाठी वापर होत असल्याची माहिती आहे. केवळ गैरसमज म्हणून ही बुवाबाजी केली जाते. व त्या कारणे लाखोंचा फायदा होतो म्हणून काही शिकारी वटवाघूळ पकडून तस्करी करीत आहेत.
वनविभाग, पोलीस, पत्रकार व गावा गावातील लोकांनी ही अघोरी कारणाने होणारी प्राणी हत्या रोखून शिकारी लोकांना जेरबंद करावे असे आवाहन करीत आहोत. कोणत्याही पक्षी व प्राण्यांची तस्करी हा अजामीनपात्र अपराध असल्याने सर्वांनी सामूहिक पुढाकार घ्यावा ही विनंती.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments